“Thanks अतुल कुलकर्णी सर म्हणत नागरिकांनी समाधान केले व्यक्त”, भव्य जनता दरबार तक्रार निवारण दिन झाला यशस्वी..

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, यांच्या कडुन सामान्य नागरिकांचे तक्रारीचे समक्ष निराकरण करण्यासाठी “भव्य जनता दरबार तक्रार निवारण दिनाचे आयोजन केल्याने नागरिकांनी केले समाधान व्यक्त.” अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या कल्पनेतुन सोलापूर ग्रामीण घटका अंतर्गत येणा-या नागरिकांचे तक्रारांचे निराकरण करण्याकरीता “जनता दरबार-तक्रार निवारण दिन” आयोजित करण्यात आले होते.
या दरम्यान पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील “अलंकार हॉल” पोलीस मुख्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. सकाळी १०.०० वा. ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत ग्रामीण भागातील तक्रारदार यांची समक्ष भेट घेण्याकरीता अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक हे स्वतः उपस्थित होते. त्याचप्रमाणे नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील संकेत देवळेकर एस.डी.पी.ओ. सोलापूर उपविभाग, जालिंदर नालकुल एस.डी.पी.ओ. बार्शी उपविभाग, विक्रम गायकवाड एस.डी.पी.ओ. मंगळवेढा उपविभाग असे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच आलेल्या तक्रारदार यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी अॅड. श्री. शिवकैलास झुरळे, उपमुख्य लोकअभिरक्षक विधीसेवा प्राधिकरण सोलापूर हे देखील हजर होते.
जनता दरबार तक्रार निवारण दिन दरम्यान जिल्हयातील सुमारे ११० नागरिकांनी आपल्या समस्या पोलीस अधिकारी यांच्या समोर मांडल्या. त्यावेळी त्यांना अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक यांनी स्वतः यांनी कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांच्या तक्रारीचे समाधान केले. तसेच ज्यांच्या तक्रारीवर पोलीस खात्याकडून दखल घेणे आवश्यक आहे अशा तक्रारी तात्काळ संबंधीत पोलीस ठाणेकडे वर्ग करून दोन दिवसात त्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तसेच जवळपास १३६ तक्रारी अर्जावरती कारवाई करुन निर्गती केली आहे.
या दिनामध्ये कौटुंबीक हिसांचाराच्या तक्रारी असल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील “भरोसा सेल” यांनी महिला तक्रारींचे निराकरण करीत असताना सुमारे दिड वर्षापासून विभक्त असलेले महिला तिच्या माहेरच्या कुटुंबियासोबत हजर असताना सासरेचे नातेवाईक यांचे योग्य ते समुपदेशन करुन तिला सासरी नांदण्यास पाठविले. दरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे अभार मानले आहेत.
सदरचा जनता दरबार व तक्रार निवारण दिन पार पाडण्याकरीता पोसई उस्मान शेख, पोहवा- रमेश काळे, पोकॉ सचिन चव्हाण, मपोना- ज्योती कोरे, मपोकॉ-पुजा करडे यांनी आलेल्या सर्व तक्रारदारांचे तक्रारी ऐकुन तक्रारीचे स्वरुपानुसार तात्काळ कारवाई होणेकरीता संबंधित पोलीस ठाणे यांच्याकडे पाठवून पाठपुरावा केला व तक्रारदाराचे निरसन केले आहे. तसेच महिला शाखा भरोसा सेल कडील मपोसई-सुरेखा शिंदे असे पथकासह हजर होते.