BSP आक्रमक.. रमाई आवास योजना प्रभावीपणे राबवून बौद्ध वस्तीसह झोपडपट्ट्यां मध्ये जनजागृती करावी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महापालिकेच्या व जिल्हा परिषदच्या वतीने रमाई आवास या योजनेसाठी हजारो अनुसुचित जाती व नवबौध्द या लोकांसाठी माता रमाई आवास योजना सुरु केलेली आहे. २०१६, २०१७ ते २०२४ या दरम्यान शहरांमध्ये महापालिकेच्या साडेतीन हजार प्रकल्प प्रलंबित आहेत. सोलापूर महानगरपालिका गलथान कारभारामुळे मागासवर्गीय समाजातील लोक योजनेच्या लाभापासून वंचित आहे.
वरिल ३५०० अर्जापैकी ४६४ अर्ज १.५ वर्षापूर्वी नगर अभियंता खात्याकडे सव्र्व्हसाठी पाठवण्यात आले होते. ते मंजुर झाले आहेत. मागील दिड वर्षामध्ये फक्त ८५० प्रकरणे गवसू तांत्रिक खात्याकडे वर्ग करण्यात आले होते. त्यापैकी ४५० प्रकरणाचा सर्व्हे पुर्ण झाला असून तांत्रिक मंजुरीसाठी महापालिकेच्या अनेक अधिकारीकडे गेले असे समजते परंतु कोणासही अद्याप रमाई आवास योजनेचा लाभ मिळाला नाही. तसेच सोलापूर जिल्हा परिषदमार्फत घरकुल बांधण्यासाठी मोठया प्रमाणात व्हायाला पाहिजे होते तसे झाले नाही त्यामुळे हजारो लोक घरापासून वंचित राहिले आहेत. यास महापालिका व जिल्हा परिषदचे अधिकारी यांची रितसर चौकशी करुन त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी.
लोकांना या घरकुलासाठी ५ लाख अनुदान देण्यात यावे व ५ ब्रास वाळू देण्यात यावी या रमाई आवास योजनेचे जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात यावी तसे न झाल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल याचे निवेदन शिष्ठमंडळाने प्रशासनास दिले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे, अँड संजीव सदाफुले, माजी नगरसेवक बबलू गायकवाड, योगेश गायकवाड, राहूल सर्वगोड यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.