महाराष्ट्र

जरांगे पाटलांना विनंती, या राज्यात कोणत्याही जातीचा धर्माचा असो त्या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेऊ : शरद पवार

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन मनोज जरांगे पुढे येत असतील, तर आपण सहकार्य करावं : शरद पवार

सोलापूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन कोणी मनोज जरांगे असो की आणखी कोणी पुढे येत असतील. तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे.

मनोज जरांगे पाटील यांचे धोरण काय.? हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे या जिल्ह्यात येऊन जरांगे पाटलांना भेटलो. त्यांना एक विनंती केली की, या राज्यात कोणताही जातीचा किंवा धर्माचा असो त्या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेऊ, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.

बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बजरंग सोनवणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!