विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या मंडळांच्या अडचणी सोडवू, सार्वजनिक मध्यवर्ती मंडळ ट्रस्ट

सोलापूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्यपुर्व काळात स्थापन झालेल्या मध्यवर्ती मंडळाच्या वतीने मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी श्रींच्या विसर्जनाची मिरवणूक प्रतिवर्षा प्रमाणे भव्य दिव्य लेझीम ढोल पथक ताफ्यासह वाजत गाजत निघते या मध्यवर्तीचे वैशिष्ट्य प्रारंभी देशमुखांच्या मानाची श्रींच्या पालखीसह सर्वात शेवट श्रध्दानंद समाजाचा आजोबा गणपती यामध्ये सहभागी होणाऱ्या इतर मंडळास येणाऱ्या अडचणी संदर्भात ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे व उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हाॅटेल ऐश्वर्या येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सुमारे अठरा मंडळांचे पदाधिकारी उपस्थित राहुन अडचणी सांगितल्या तसेच लवकरात लवकर सहभागी होऊन मानाचा आजोबा गणपती रात्री बारा वाजेपर्यंत शक्यतो विसर्जन होण्यासंदर्भात प्रयत्नशील राहु असे मत व्यक्त केले.
या बैठकीत ट्रस्टी सुनील रसाळे, दास शेळके, संजय शिंदे, गौरव जक्कापुरे, भाऊ रोडगे, माजी अध्यक्ष अमोल शिंदे, यांच्यासह इतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले. या बैठकीस माजी आमदार ट्रस्टी नरसिंग मेंगजी, श्रीशैल बनशेट्टी, विजय पुकाळे, अनिल गवळी, माजी अध्यक्षा श्रीमती लताताई फुटाणे, सोमनाथ मेंडके, उत्सव उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम, चिन्मय पाटील, संतोष खंडेराव, मल्लिनाथ सोलापुरे, विजयकुमार बिराजदार, शिवानंद येरटे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.