सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

धाराशिव पॅटर्न राज्यभर राबवा, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना मागण्या, राजश्री चव्हाण यांचा पुढाकार

सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे जाऊन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी सदर बाब निदर्शनास आणून दिली.

लोकसभेच्या निवडणुका लागल्यामुळे व तसेच आचारसंहिता लागल्यामुळे महाराष्ट्रातील व सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील विविध विकासकामे थांबली होती. त्याबाबत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना समक्ष भेटून आदिवासी पारधी समाज हा बराच तालुक्यात व ग्रामीण भागात विखुरलेला असून त्यांची दैनंदिन दुरवस्था झाल्याने त्यांना रोजगाराच्या शोधार्थ गावोगावी भटकावे लागत आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी नीती आयोग अंतर्गत आदिवासी पारधी समाज यांना विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत धाराशिव जिल्ह्यात वापरण्यात आलेला पॅटर्न प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात राबवण्यात यावा यासाठी आपले स्तरावर पाठपुरावा करून पारधी समाजातील शिकलेल्या सुशिक्षित बेरोजगार, तरुण, तरुणी, महिलासाठी व्यवसायासाठी मळणी यंत्र, मिनी ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा, हॉटेल ढाबा व्यवसाय, अशा विविध योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या विभागाच्या स्तरावरून बैठक लावून पारधी समाजाचा जटील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती मोर्चा सरचिटणीस नकुल चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण, सरपंच भूषण चव्हाण, बेंगलोर फिल्म सिटी सिनेमा कलाकार रामचंद्र पवार, सचिन काळे पंढरपूर हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!