महाराष्ट्रआरोग्यराजकीयसामाजिकसोलापूर

शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील आक्रमक, शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा.. अखिल भारतीय छावा संघटनेचा इशारा

सोलापूर : प्रतिनिधी (औसा, लातूर)

औसा तालूक्यासह राज्यामध्ये सोयाबीन उत्पादन जास्त प्रमाणात आहे. गतवर्षीचा पिक विमा व शासनाने जाहीर केलेले अनुदान ई-पिक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला नाही व गतवर्षी हमी भाव 4600 असून ही या भावात शेतकऱ्यांकडुन खरेदी केली नाही. यावर्षी सोयाबिनला 8500/- हमी भाव करुन शासकीय खरेदी चालू करुन सर्वच शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करुन शेतकऱ्यांचे आर्थीक बळ वाढवावे.

गतवर्षी हमीभाव 4600 असून सुध्दा बाजारात 4300 रु पर्यत ते सोयाबिन खरेदी केले गेली आहे. असे न होता या चालू वर्षी 4892 रु हा केंद्राचा निर्णय आहे हा हमी भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जो निर्णय घेतलेला आहे. 19 लाख मॅट्रीक टन पामतेल व 15 लाख मॅट्रीक टन सोयाबिन बाहेरील देशातून खरेदी केलेला आहे. या निर्णया मुळे महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भामध्ये सोयाबिन चे उत्पादन जास्त प्रमाणात आहे.

या निर्णयामुळे येथील शेतकऱ्यांच्या सोयाबिनला भाव मिळणार नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये येणार आहेत या निर्णयाचा अखिल भारतीय छावा संघटना जाहीर निषेध करते. या वर्षी सोयाबिन ला 8500/- रु भाव दयावा अन्यथा लवकरच छावा संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल.

असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला यावेळी शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील, सल्लागार भगवानदादा माकने, जिल्हाप्रमुख दिपक नरवडे, उपप्रमुख मनोज लंगर, वि आ जिल्हाप्रमुख मनोज फेसाटे, औसा कार्याध्यक्ष नितीन साळुंके, रमाकांत करे, केशव पाटील, बालाजी माळी, मारुती मुडबे, राज जावळे, अविनाश जंगाले, महेश बिश्वास, गोपाळ चाळक, गणेश पाटील यांच्यासह पदाधीकारी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!