सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांना त्रास झाला तर, मनोज जरांगे पाटिल यांचा इशारा..

सोलापूर : प्रतिनिधी

एखाद्या मराठ्याच्या अधिकाऱ्याकडे गेले तर तू मराठा आहे म्हणून काम करत नाही का असं धमकवायचे. त्याला काम करायचे नसले तरी काम करावं लागायचे. डॉक्टरांकडे जाणार. मराठा आहे म्हणून बील कमी करत नाही का. वकिलाकडेही जायचे. मराठ्यांचा आहे म्हणून फि जास्त घेतो का म्हणून वकिलाला बोलायचे. मराठ्यांचा मंत्री आहे म्हणून काम करत नाही का असं मंत्र्यांना म्हणायचे, पदाचा आणि जातीचा काय संबंध आहे? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

मराठ्यांना कोणी अडचणीत आलं तर बघ्याची भूमिका घेऊ नका. सर्वांनी त्याच्या मदतीला जायचं. अजिबात मागे हटायचं नाही. सपोर्ट करावा लागणार आहे. भांडण नाही करायचं. तुम्ही फक्त उभं राहा. दहशत कमी होते. तुम्ही उभे राहत नसल्याने ही दहशत वाढली आहे. कुणाच्या पायाही पडू नका. तुमच्या हातात सत्ता दिली म्हणजे तुम्ही अन्याय करणार का. मराठा अधिकाऱ्याला कुणालाही कुणी त्रास दिला तर मदतीला जायचं. नाही तर छगन भुजबळ सारख्या भंगार लोकांचं फावतं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

मी फक्त माझ्या समाजाची इज्जत करतो. बाकीच्यांची करतो. पण माझ्या समाजाला त्रास देणाऱ्यांची इज्जत करत नाही. एकटाच ५० ते ५५ टक्के मराठा आहे. काय गरज आहे आम्हाला कोणाची. फक्त त्यांनी आम्हाला जी वस्तू हातात घ्यायची ती घ्यायला लावू नका. मराठ्यांना त्या वळणावर जायचं नाही. त्यामुळे म्हणतो मला वेळ गरजेची आहे. मी शेवटचं टोक गाठत नाही, असं जरांगे म्हणाले.

मराठ्यांशिवाय तुमचं चालत नाही. कशाला विरोध करता. कशाला आमच्या नादी लागता. इथे चपलासकट पाया पडल्याशिवाय पर्यायच नाही. ही लय बेक्कार जात आहे मराठ्यांची. उद्या सकाळी मला गोळ्या घाला. तरीही मी तुमचा होणार नाही. तुम्ही सहा ट्रक भरून नोटा आणल्या तर मी म्हणेल विहिरीत टाक. तुम्ही म्हणाल सकाळी सकाळीच तुम्हाला मंत्रीपद देतो तरी मी घेत नसतो, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!