सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

देवेंद्र फडणवीस यांनी माझे पालकत्व स्वीकारलं आणि आज खऱ्या अर्थाने तात्यांचे स्वप्न पूर्ण झाले : आमदार देवेंद्र कोठे

सोलापूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांच्या आशीर्वादाने शहर मध्यवर “काटे की टक्कर” च्या सामन्यात युवा विकासाभिमुख नेतृत्व लोकप्रिय व्यक्तिमत्व देवेंद्र दादा कोठे यांनी विरोधकांना घरचा रस्ता दाखवत लाखांच्या मताधिक्याने घवघवीत यश प्राप्त केले. “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण” योजना यंदाच्या निवडणुकीत प्रभावी ठरली आणि सोलापूरसह राज्यात परिवर्तनाची लाट प्रामुख्याने पाहायला मिळाली. राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केली. राज्यात देवेंद्र सोलापूरात देवेंद्र हा पॅटर्न यंदाच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला. घवघवीत यशानंतर आमदार देवेंद्र कोठे यांचा विविध सामाजिक संघटना, राजकीय वर्तुळातील लोकप्रतिनिधी, शासकीय, साहित्यिक, शैक्षणिक, माध्यम समुहासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून जंगी सत्कार केला जातोय.

आमदार देवेंद्र कोठे यांचा मित्र परिवाराच्या वतीने मेकॅनिक चौक येथील संपर्क कार्यालयात पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुहास कोलारकर, वैभव गंगणे, अमृत भुरळे, मोहन माळी, नवनाथ कोलारकर, पिंटू रणदिवे यांची उपस्थिती होती.

दरम्यान या विजयानंतर आमदार देवेंद्र कोठे यांच्या समवेत माध्यमांनी मनमोकळा संवाद साधला .यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्याला मिळालेल्या विजयात मतदारांचा, लाडक्या बहिणींचा,पक्षाचे शहराध्यक्ष ,पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच घटक पक्षातील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि या निवडणुकीसाठी विशेष परिश्रम घेतलेले आपले समर्थक,प्रबोधन मंच यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.

यंदाची ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. पूर्वी या मतदार संघात आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढवली होती . त्यावेळी प्रणिती शिंदे यांना ६०,००० इतकेच मताधिक्य मिळत होते यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रणिती शिंदे यांच्या मताधिक्यांवर मोडीत काढत दुपटीने रेकोर्डब्रेक करून विजय मिळवला . यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचे डिपॉझिट जप्त झाले. आणि काँग्रेसचे अस्तित्वच संपले.

 

मतदारांनी विश्वासाने सोपवलेल्या संधीचे नक्कीच सोने करू असा विश्वास व्यक्त केला . यापुढे आपल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सोलापुरातील यंत्रमाग धारक कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार, सेटलमेंट भागात घरकुल व आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार,सोलापुरातील पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल याकडे प्राधान्याने लक्ष असणार , असल्याचे सांगितले.श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने व तात्यासाहेबांच्या पुण्याईमुळे हे शक्य झाले असे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!