बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक उपोषण मागे घ्यावं देवेंद्र फडणवीसांच आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी (अंतरवली सराटी)
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणात सगेसोयरे ची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी यावेळेस सरकारच्या वतीने बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांची मध्यस्थी सुरू केली आहे.
दरम्यान, आमदार राऊत यांनी मंगळवारी रात्री उशिरा जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलनाविषयी चर्चा केली. सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे फोनवर बोलणे करून देत जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असल्याची माहिती फडणवीस यांना दिली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आमदार राऊत, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थित कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर एक सलाईन देखील लावून घेतले.
सोमवारी राऊत यांनी बार्शीत पत्रकार परिषद घेऊन यावेळी जरांगे पाटील यांना जास्त दिवस उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही असे सांगितले होते. व तात्काळ अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी देखील या प्रश्नो चर्चा केली होती. त्यानंतर आज पुनः त्यानी मध्यरात्री जरांगे पाटील यांची उपोषण मागे घेण्याबाबत चर्चा केली आहे.
आरक्षणाबाबत सरकार नेहमीच सकारात्मक, मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं : देवेंद्र फडणवीस
मराठा समाजाला सगेसोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाच दिवसां पासून उपोषणाला बसले आहेत. मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती, ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले. पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही, तर उपचार घेणार नाही, अशी आपली भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्म आहे, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं.
ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे, त्यांना सर्टिफिकेट देता येतं. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष ठरवून दिलेत त्यांनी कशात बसणारच नोटिफिकेशन काढण्यात आलेय. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं पाहिजे असे आमचे मत आहे. आरक्षणाबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या तीन दिवसात जरांगे पाटील आणि सरकार यांच्याशी संपर्क ठेऊन आहेत. आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नांना यश मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. येत्या दोन दिवसात मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी पुन्हा ते दोन मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह मनोज जरांगे पाटलांची घेणार भेट आहेत.