सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रसामाजिक

पुणे येथील जेष्ठ पत्रकार राजेंद्रकृष्ण कापसे यांना “भागवत धर्म प्रचारक पुरस्कार” देऊन केला सन्मान

संत मुक्ताईच्या सोहळ्यात महिला दिंड्यांना प्राधान्य देणार रवींद्र पाटील यांची ग्वाही

सोलापूर : प्रतिनीधी (पंढरपूर)

संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याला मोठी परंपरा आहे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व कर्नाटक राज्यातील अनेक दिंड्या या सोहळ्यात चालतात. पुढील काळात महिला वारकरी दिंड्यांना या सोहळ्यात प्राधान्य दिले जाईल असे श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले.

संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर यांच्या वतीने स्वर्गीय प्रल्हादराव पाटील यांचे स्मरणार्थ भागवत धर्माचा प्रचार, प्रसार करणा-या व वारीचे वार्तांकन करणा-या पत्रकाराला “भागवत धर्म प्रचारक पुरस्कार” दिला जातो. यंदाचा पुरस्कार जेष्ठ पत्रकार राजेंद्रकृष्ण कापसे (पुणे) यांना देण्यात आला. याप्रसंगी आयोजित समारंभात रवींद्र पाटील बोलत होते.

या समारंभास पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, विश्वस्थ पंजाबराव पाटील, संदीप पाटील, सम्राट पाटील, अमोल पाटील, पंकज पाटील, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड विलास काटे, मनोज मांढरे, माजी आ शरद ढमाले, मारुती कुरपे, दत्तात्रय दोरकर, रामचंद्र गायकवाड, भाउ आखाडे, दत्तात्रय उभे, संजय पाटील, प्रकाश मोकाशी, शंकर सरपाटील, जालींदर डोंबे, गणेश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

ह भ प हरणे महाराज म्हणाले, पत्रकारांनी वारीच्या माध्यमातुन सकारात्मक वारी समाजामध्ये पोहोचविण्याचे काम केले आहे. वारीचे वाढते रुप हे प्रसार माध्यमाची देण आहे. आज पालखी सोहळ्यात ज्या सोयी सुविधा शासन उपलब्ध करुन देत त्यामध्ये प्रसार माध्यमांचा मोठा वाटा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!