सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

लढायचे की पाडायचे 29 ऑगस्टला ठरवणार मनोज जरांगेची सोलापुरात घोषणा, मराठा क्रांती मोर्चा ने केले उत्कृष्ट नियोजन

सोलापूर : प्रतिनिधी

मला गोळ्या घातल्या तरी हसत मरण पटकन पण मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देणार यासाठी जरा दम धरा, त्यापूर्वी विधानसभेला आपण लढायचे की, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडायचे याचा फैसला 29 ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी येथे करू अशी घोषणा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे यांनी लाखो मराठा बांधवांसमोर सोलापुरात बोलताना केली.

मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीची सुरुवात बुधवारी सोलापुरातुन झाली,छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगेची सभा पार पडली,सकाळ पासूनच मराठा समाजबांधव जरांगेना ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते.

एक मराठा लाख मराठा आशा जयघोषांनी परिसर दणाणून गेला होता,दरम्यान यावेळी हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी घालून आबालवृद्ध या शांतता रॅलीत सहभागी झाले होते, दुपारच्या सुमारास जरांगे पाटील यांचे सोलापुर शहरात आगमन झाले. ठिकठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान जरांगे यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केलं., तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी पार चौकातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले.

त्यानंतर जरांगे हे संभाजी महाराज चौकातून रॅलीने शिवाजी महाराज चौकात दाखल झाले.यावेळी मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत केले

दरम्यान दुपारी 4 वाजता मनोज जरांगे यांचे सभास्थळी आगमन झाले. यावेळी त्यांचा भव्य हार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तब्बल 1 तास भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत नारायण राणे,प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राज ठाकरे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.,मी मॅनेज होत नाही म्हणून मला बदनाम केले जात असून विरोधात टोळ्या उभे केले जात आहेत, समाजाच्या नेत्यांनी पक्ष आणि नेता बाजूला ठेऊन फक्त मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे असं आवाहन त्यांनी केले.

मराठा आरक्षणाला उघड पणे विरोध करणारे छगन भुजबळ यांना फडणवीस ज्या मतदारसंघात जातील तिथला उमेदवार पाडा असं आवाहन करत त्यांनी माढा येथील अरण मध्ये झालेल्या कार्यक्रमाचा उल्लेख केला.,त्याचप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे एकत्र बसून निवडणूक लढवायची का अन्य उमेदवार पाडायचे हा निर्णय घेणार असून मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जरांगे यांनी केले.

मराठा समाजातील लोकांनी पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नका. समाजाला बाप मानून काम करा असं सांगत सर्वच पक्षाला या निवडणुकीत धडा शिकवणार असून एकच उमेदवार मराठा समाजाचा देऊ. आपसात वाद असले तरी समजाने दिलेला उमेदवार 100 टक्के मतदान करून निवडून आणा असेही मनोज जरांगे म्हणाले, भाजप ने एका मराठा क्रांती मोर्चाचे 3 करून आपल्यात फूट पाडण्याचे प्रयत्न केले, मराठा आणि कुणबी एकच असताना समाज मागास असल्याचे सिद्ध झाले असताना हि आरक्षण मिळत नाही त्यामुळे आता हि लढाई निर्णायक लढा असून जोपर्यंत ओबीसीतुन मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मला गोळ्या जरी घातल्या तरी माघार घेणार नाही अशी गर्जना जरांगे यांनी केली.

दरम्यान यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव शांतता रॅलीत सहभागी झाले होते.,या रॅलीच्या यशस्वीतेसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनीपरिश्रम घेतले.

रुग्णवाहिकेला वाट मोकळे करून दिली 

छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज रंगे यांच्या आगमन झाल्यानंतर गर्दीतून एक रुग्णवाहिका आली तेव्हा रस्त्यावर बसलेल्या महिलांनी या रुग्णवाहिकेला बाजूला आहोत वाट मोकळी करून दिली.

मनोज जरांगे यांचे सभास्थानी आगमन झाल्यानंतर उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर क्रेनने हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे दास शेळके, दिलीप कोल्हे, अमोल शिंदे, सुनिल रसाळे, श्रीकांत घाडगे, अनंत जाधव, गणेश वानकर, रवी मोहिते, संजय शिंदे, शेखर फंड, योगेश पवार, बाळासाहेब गायकवाड, दिनेश जाधव, महेश सावंत, विजय पोखरकर, शिरीष जगदाळे, सचिन साळुंखे, मोहन चोपडे, संजय पारवे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीसाठी उपस्थित समाज बांधवांना भोजनाची सोय 

शहर व जिल्हाभरातून शांतता रॅलीसाठी आलेल्या मराठा समाज बांधवांना फुड पाकिटे व जेवणाची सुविधा आ.बबनराव शिंदे यांनी केली होती. एक लाख समाज बांधवांना पुढील इतका मसाला भात, गोड शिरा देण्यात आला यासाठी पहाटे चार पासून यंत्रणा कार्यरत होती. मराठा क्रांती मोर्चा आयोजकाच्या वतीने जागेवरच व पाणी बाटली फुड पाकिट देण्यात आली अतिशय शांततेत व शिस्तबद्धरीत्या ही शांत झाली पार पडली.

शिवाजी महाराज चौकात लाखोंचा उसळला जनसमुदाय

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या संपूर्ण जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव दाखल झाले होते घरातील संपूर्ण सदस्य आले होते .छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिकडे तिकडे मराठा समाज बांधवांचीशागर्दी दिसून येत होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!