सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मनोज जरांगेंना मराठा नेत्यांकडून ८ दिवसाचा ‘अल्टिमेटम’, बार्शीतील अण्णासाहेब शिंदेंच्या प्रश्नामुळे मराठा समाजाच्या भुवया उंचावल्या

सोलापूर : प्रतिनिधी

बार्शी तालुक्यात मराठा समाज बांधवाने डिजिटल फलक लावत मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने काय भूमिका घ्यावी.महायुतीला पाठिंबा द्यावयाचा महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावयाचा?मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संभ्रमात पडला आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.मात्र महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाबाबत जाहिरपणे किंवा ठोस आश्वासन मिळाले नाही. जरांगे पाटील यांना प्रश्न विचारत बार्शी मधील अण्णासाहेब शिंदें या मराठा नेत्याने डिजिटल फलक लावले आहे.जरांगे पाटील यांनी खुलासा नाही केला तर,बार्शी मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

अण्णासाहेब शिंदें यांचे डिजिटल फलकात प्रश्न

बार्शी मधील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या. मनोज दादा यापूर्वी मराठा-मुस्लिम वाद, मराठा-दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे. त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा. देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का? असे प्रश्न अण्णासाहेब शिंदें यांनी उपस्थित केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!